प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं. हे कोणाच्या हातात नाही, असं तुम्ही ऐकलं असेल. बिहारच्या जुमईमध्ये तर हद्द पार झाली. एका विवाहित महिला आपल्या भाच्याचा प्रेमात पडली. दोघे लपून-छपून भेटू लागले. पतीला याबद्दल कळताच विषय पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. खूप गोंधळ झाला. पोलिसांनी समज दिल्यानंतर पत्नी पतीसोबत परतली. पण सहा दिवसापूर्वीच ती घरातून पळून गेली. ही घटना टाऊन पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. आठ वर्षांपूर्वी आयुषी आणि विशालच लग्न झालं. लग्नानंतर एक मुलगी झाली. दोघांमध्ये चांगलं नातं होतं. दोन वर्षांपूर्वी महिलेच्या आयुष्यात गावातीलच एका युवकाची एन्ट्री झाली. गावातील हा युवक नात्यात महिलेच्या नवऱ्याचा दूरचा भाचा लागत होता. दोघांमध्ये तासनतास बोलणं व्हायल लागलं.
आयुषी भाचा सचिन सोबत राहण्याचा हट्ट करु लागली. या प्रकरणी महिला पोलीस ठाण्यात पतीने अर्ज दिला. त्या आधारावर दोघांना बोलवून चर्चा करण्यात आली. असं वाटलं की आता सर्वकाही ठीक होईल. या दरम्यान पती आणि प्रियकरामध्ये जोरदार भांडण झालं. आयुषी सचिनला भेटायची. अखेर सहा दिवसांपूर्वी आयुषी घर सोडून सचिनसोबत पळून गेली.
पती विशालने या प्रकरणी टाऊन पोलीस ठाण्यात सचिनच्या विरोधात शस्त्राच्या धाकावर पत्नीच अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. ‘6 दिवसांपूर्वी ती माझ्यासोबत होती. रात्री ती गायब झाली’ असं विशाल म्हणाला. अपहरणाचा आरोप सचिनवर लागला. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर सचिन आणि आयुषीने न्यायालयात आत्मसमर्पण केले. दोघांच स्टेटमेंट नोंदवण्यात आलं. आयुषी सचिनसोबत रहायला तयार झाली. मुलगी पिता विशाल दुबे यांच्याकडे आहे. आयुषीने कोर्टात स्टेटमेंट दिल्यानंतर गावातच शिव मंदिरात सचिनसोबत लग्न केलं. सचिन आणि आयुषीच्या या नात्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. अखेर सचिनला आयुषीसोबत राहत घर सोडावं लागलं. दोघे आता कुठे दुसऱ्याठिकाणी रहातयात.