धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात भीषण अपघात झाला असून, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहनातून नातेवाईक अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, पिकअप वाहनाचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झालं.
ही घटना आज सकाळी तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर घडली.
अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.