Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी, नवा कार्यक्रम असा

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी, नवा कार्यक्रम असा

महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अकरा दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल केला आहे. त्यामध्ये गुगल मॅपवर तयार केलेल्या प्रभागाच्या हद्दी तपासण्यासाठी जवळपास एक महिना दिला असून, यामुळे अंतिम प्रभाग रचना आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल.

 

परिणामी, पुढील प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने नवीन वर्षात निवडणूक होईल.

 

नगरविकास विभागाने १२ जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात प्रगणक गटाची मांडणी, माहिती तपासणीचा कालावधी ‘जैसे थे’ आहे. २३ जूनपर्यंतची स्थळ पाहणी ३० जूनपर्यंत वाढवली आहे तर पूर्वी २४ ते ३० जूनपर्यंत गुगल मॅपवर नकाशा तयार करून हद्द तपासणी केली जाणार होती. या प्रक्रियेचा कालावधी वाढवला आहे. नव्या कार्यक्रमानुसार एक ते पाच जुलैदरम्यान गुगल मॅपवर नकाशा तयार करून सहा जुलैपासून २४ जुलैपर्यंत हद्द तपासणी केली जाणार आहे. त्याला एक महिना दिला आहे.

 

जुन्या कार्यक्रमानुसार एक ते तीन जुलैपर्यंत प्रभागरचना मसुद्यावर समितीच्या सह्या करून आठ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचे होते. त्यानंतर १५ ते २१ जुलैपर्यंत रचना प्रसिद्ध करून हरकती मागवून २२ ते ३१ जुलैपर्यंत सुनावणी घ्यायची होती. त्यातून १ ते ७ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी पाठवून २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर करायची होती.

 

नवा कार्यक्रम असा

 

नवीन कार्यक्रमात मसुदा तयार करून समितीच्या सह्यांचा कालावधी २५ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत केला आहे. नगरविकास विभागाला ८ ते १२ ऑगस्‍टपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पाठवायची आहे. नगरविकासकडून राज्य निवडणूक आयोगाला १३ ते २५ ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना पाठवली जाईल. प्रारूप प्रभाग रचना ३ ते ८ सप्टेंबरला प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यावर ९ ते १८ सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेऊन २२ सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना मंजुरीसाठी पाठवायची आहे. ती २९ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

 

जानेवारी-फेब्रुवारीत मतदान

 

नवीन वाढवलेल्या कालावधीमुळे प्रभाग रचनेनंतर एक महिना प्रभाग आरक्षण सोडतीसाठी लागणार आहे. त्याचे गॅझेट होऊन मतदार याद्यांची फोड, प्रारूप मतदार यादी, त्यावर हरकती-सूचनांनंतर अंतिम मतदार यादी तयार होईल. यासाठीही महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर होईल. यातून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मतदान होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -