अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळले. भारतालाही इंधनाच्या टंचाईची सामना करावा लागला. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात 60 दिवसांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेसोबत युद्ध झाल्यानंतर आता इराणने वेगळा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धानंतर इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत कर लावण्याच्या विचारात आहे.
इराण ओमानाच्या सोबतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीत सर्व्हिस कर आकारण्याची योजना तयार करत आहे. याबाबत खुद्द इराणच्या राजदूतांनीच माहिती दिली आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरली तर भारतालाही त्याची झळ बसू शकते. कच्च्या तेलाची आयात करताना भारताला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
चीनमधील बिजिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड पीस फोरममध्ये इराणी राजदूत अब्दोलरेजा रहमानी फजली यांनी इराणची बाजू मांडली. यावेळी त्यांनी आम्ही ओमानच्या सोबतीने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण असावे यासाठी प्रयत्न करत आहोत.
