हार्दिक पंड्या आयपीएल नंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. कारण तो अजून फिटच नाहीय. त्यामुळे आता प्रश्न विचारणं सुरु झालय, तो वनडे वर्ल्ड कप 2027 च्या टीममध्ये असेल का?. टीम इंडियाने त्याच्याशिवाय आपली तयारी सुरु केली आहे का?. हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याकडे इशारा सुद्धा केला आहे. हार्दिक पंड्या अजून 10 ओव्हर पण टाकू शकत नाहीय. तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याची टीम इंडियात निवड होईल असं हेड कोच गौतम गंभीर स्पष्टपणे म्हणाले. टीम इंडियाला हार्दिकच्या समावेशासाठी कुठलीही घाईगडबड करायची नाहीय. गौतम गंभीर यांनी हार्दिक पंड्याला पर्याय तयार केला आहे. पंड्या जरी खेळला नाही, तरी त्याची जागा भरुन काढणारा दुसरा खेळाडू तयार आहे. तो कोण आहे? त्या बद्दल जाणून घेऊया
नीतीश कुमार रेड्डी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी पूर्णपणे तयार दिसतोय. बॅट आणि बॉलने दमदार प्रदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा पुरावा तो सातत्याने देत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सलग दोन सामन्यात त्याने प्रत्येकी 3-3 विकेट काढले. टी 20 फॉर्मेटमध्ये नितीश कुमार रेड्डीचा टप्पा आणि गती कमालीची होती. त्याचा चेंडूवर सॉलिड कंट्रोल दिसला. तो आधीपेक्षा घातक गोलंदाज वाटला
नीतीश रेड्डीला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता होती. तशी तो करतोय. फलंदाजीत तो पारंगत आहेच. टॉप ऑर्डर पासून मिडल ऑर्डर तो कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो. चांगल्या डिफेन्ससह मोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला आहे. नितीश कुमार रेड्डीने वनडे फॉर्मेटच्या चार इनिंगमध्ये 33.33 च्या सरासरीने 100 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याने 30.33 च्या सरासरीने 91 धावा केल्या आहेत. दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट खूप जास्त आहे. नितीशला फक्त आपल्या फिटनेसची काळजी घेण्याची गरज आहे. अलीकडे त्याला बऱ्याचदा दुखापतीचा सामना करावा लागला आहे.
