शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली,” असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर रवाना
आज ९ आणि १० सप्टेंबरला ब्रिटिश संसदेत विशेष कार्यक्रमहाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप . रिकग्निशन’ पुरस्कार. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ने गौरव. महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके संबंधांवर शिंदे मार्गदर्शन करणार. महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. आज जरांगे यांच्या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. राज्यात इतरही ठिकाणी मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर मोठे विधान केले. 29 ऑगस्ट 2023 पासून ते आतापर्यंत एकूण 11 वेळा उपोषण, तीन वर्षात 83 दिवस झाले उपोषण. 12 तारखेला अतरवालीत होणार राज्यव्यापी बैठक होईल. सरकारने एकही मागणी पूर्ण केली नसल्याचं सांगत 12 तारखेला मुंबईत जाण्यासाठीची तारीख ठरवली जाणार असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान सरकार काही हालचाली करतं की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यानच राज्यात पावसाचे मोठे संकट आहे. पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकरी चिंचेत आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
