Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगजाळून टाकला ५०० कोटींचा गांजा!

जाळून टाकला ५०० कोटींचा गांजा!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या कारवाया अंमली पदार्थ विरोधी पथकांनी केल्याचे आपण ऐकले असेल. अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्यामध्ये लाखो रुपयांचे पकडल्याचे वृत्त समोर येत असते. पण, आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल २ लाख किलो वजनाचा आणि ५०० कोटी रुपये किंमतीचा गांजा जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा गांजा शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी जाळल्याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंतची आंध्र प्रदेशमधील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

वेगवेगळ्या कारवायांमध्ये हा २ लाख किलोचा गांजा जप्त केला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश सरकारने मिशन परिवर्तनची घोषणा केली. यामध्ये राज्यभरातील गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये हा २ लाख किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश पोलिसांनी या मिशनमध्ये तब्बल ८ हजार ५०० एकरवर असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. यात आत्तापर्यंत एकूण १ हजार ३६३ गुन्हे नोंद करण्यात आले असून १ हजार ५०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५६२ आरोपी हे इतर राज्यातून आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गांजा विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनाकपल्ली या ठिकाणापासून जवळच असलेल्या कोडुरु गावात जाळण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक डी. गौतम सावंग यांच्या उपस्थितीत हा गांजा जाळण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -