Homeमहाराष्ट्र'या' योजनेत 330 रुपयात मिळते 2 लाख रुपयांचे विमा कव्हर, कोणत्याही बँकेत...

‘या’ योजनेत 330 रुपयात मिळते 2 लाख रुपयांचे विमा कव्हर, कोणत्याही बँकेत करू शकता अप्लाय, जाणून घ्या

केंद्र सरकारने सर्व वर्गातील लोकांसाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना Pradhan Mantri Jeevan jyoti Bima Yojana सुरू केली आहे. ही योजना कोणीही भारतीय नागरिक वार्षिक 330 रुपयांच्या प्रीमियमवर खरेदी करू शकतो. या विमा पॉलिसीमध्ये ग्राहकाला 2 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते.

प्रत्येक वर्षीचा हप्ता बँक खात्यातून आपोआप कापला जातो. देशभरात सुमारे 12.12 कोटी लोक पीएम जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेत आहेत. तुम्हालाही पीएम जीवन ज्योती पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रकारे अर्ज करू शकता.

1 जून ते 31 मे मानले जाते एक वर्ष पीएम जीवन ज्योती योजनेतील विमा पॉलिसी 1 जूनपासून सुरू होते आणि 31 मे पर्यंत वैध असते. त्याच वेळी, पॉलिसीची प्रीमियम रक्कम प्रत्येक वर्षी देय तारखेला ग्राहकांच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. त्यामुळे दरवर्षी या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची गरज नाही.

अर्ज कसा करावा

18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक पीएम जीवन ज्योती पॉलिसीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही एक फॉर्म भरून या पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. दुसरीकडे, जर दावा करण्याची गरज असेल, तर तुम्ही संबंधित बँकेच्या शाखेत आवश्यक कागदपत्रे देऊन दावा करू शकता.
कधी मिळतील 2 लाख रुपये – पीएम जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाचा 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर, या योजनेंतर्गत सरकारकडून दिलेली 2 लाख रुपयांची रक्कम पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दिली जाते, जेणेकरून, अशा अडचणीच्या वेळी, त्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून देता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -