Saturday, March 15, 2025
Homeक्रीडाIndia vs Sri Lanka Test Day 2 : भारताला पहिला धक्का, मयांक...

India vs Sri Lanka Test Day 2 : भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी

मयांक अग्रवाल ३४ चेंडूंमध्ये २२ धावा करीत माघारी परतला आहे. भारताच्या पहिल्या डावात भारताने सावध सुरूवात केली आहे.

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकामध्‍ये दुसर्‍या कसोटी सामन्‍यातील दुसर्‍या दिवशी भारताची दमदार सुरुवात झाली. १०९ धावांमध्‍येच श्रीलंकेचा पहिला डाव आटाेपला. भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने ५ बळी घेतले. बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्‍ये प्रथम पाच विकेट घेतल्‍या आहेत. त्‍याने १० षटकामंध्‍ये २४ धावा देत ही कामगिरी केली.

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देऊ लागल्याने या खेळपट्टीवर फलंदाज चाचपडत आहेत. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अचूक गोलंदाजी करताना भारताला 252 धावांत रोखल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा न उचलला तर नवलच. भारताला प्रत्युत्तर देणार्‍या श्रीलंकेचा डाव 6 बाद 86 असा अडचणीत आला आहे. लंकेचा संघ अजून पहिल्या डावात 166 धावांनी पिछाडीवर आहे.
पहिल्या सत्रापासूनच खेळपट्टीवर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर माती उडत होती; पण या गंभीर परिस्थितीतही श्रेयस अय्यर खंबीर उभा राहिला आणि दमदार खेळ करताना भारताचा डाव सावरला; पण दुसर्‍या बाजूने त्याला साथ देण्यासाठी कोणीही तग धरला नाही. शेवटी तो शतक पूर्ण करण्यासाठी जलदगतीने खेळत असताना 92 धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित व मयंक यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देणे अपेक्षित होते; परंतु तसे घडले नाही. दुसर्‍याच षटकात मयंक धावचीत झाला. त्यापाठोपाठ रोहितही 15 धावा करून माघारी परतला. विराट व हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसर्‍या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली; परंतु प्रवीण जयविक्रमा याच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी 31 धावांवर बाद झाला. धनंजय डिसिल्वाच्या गोलंदाजीवर विराट (23) बाद झाला.

ऋषभ पंतने फटकेबाजी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याचा एक झेलही सोडला गेला; पण चेंडूची उसळी ओळखण्यात तोही अपयशी ठरला अन् भारताला मोठा धक्का बसला. 26 चेंडूंत 7 चौकारांसह 39 धावा करणारा ऋषभ त्रिफळाचीत झाला. लसिथ एम्बुल्देनियाच्या चेंडूवर कट मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. रवींद्र जडेजाही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही आणि एम्बुल्देनियाने त्यालाही 4 धावांवर बाद केले. श्रेयस अय्यर स्टार ठरला. मुंबईचा खडूसपणा येथे दाखविताना त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने गगनचुंबी षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने भारताला 200 पार नेले. 82 धावांवर श्रेयसचा सीमारेषेवर झेल सुटला. त्यानंतर त्याने आणखी एक खणखणीत षटकार खेचला. 91 धावांवर त्याला रन आऊट करण्याची संधी गमावली; पण पुढच्या षटकात जयविक्रमाने भारताचा डाव गुंडाळला. श्रेयस 98 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 92 धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव 252 धावांवर गडगडला.

श्रीलंकेकडून एम्बुल्देनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताला रोखल्यानंतर श्रीलंकन फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती; परंतु भारतीय मार्‍यापुढे त्यांनी लगेचच नांगी टाकायला सुरुवात केली. डावाच्या तिसर्‍या षटकात जसप्रीत बुमराहने कुशल मेंडीसला (2) बाद केले. यानंतर थिरिमाने (8), करुणारत्ने (4), धनंजय डिसिल्व्हा (8) आणि चरिथ असलंका (5) हे पाचजण पन्नाशीतच तंबूत परतले. अँजेलो मॅथ्युजने आपला सर्व अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरली होती; पण दिवसाचा खेळ संपता संपता बुमराहने त्यालाही बाद करून श्रीलंकेच्या अडचणीत भर टाकली. खेळ संपला तेव्हा निरोशन डिकवेला (13) आणि लसिथ एम्बुल्देनिया (0) हे खेळपट्टीवर नाबाद आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -