ताजी बातमी ऑनलाइन टीम
मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याच्या मागणीसाठी मनसेने अक्षयतृतियेला राज्यभर महाआरती करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या दिवशी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद असल्याने महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मंगळवारी महाआरतीबाबत ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आनंदात जावा, यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद येथे जंगी सभा घेतली. या सभेतही त्यांनी भोंग्यांबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली. या सभेनंतर महाआरतीची तयारी सुरू करण्यात आली होती.
ही महाआरती स्थगित करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतिया या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी व्टिटव्दारे मांडेन, असे या निवेदनात राज यांनी स्पष्ट केले आहे.
ही महाआरती स्थगित करताना राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतिया या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी व्टिटव्दारे मांडेन, असे या निवेदनात राज यांनी स्पष्ट केले आहे.