क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान (t20 world cup 2022) आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ आशिया कप मध्ये परस्परांना भिडतील. आशिया कपच शेड्यूल जाहीर झालं आहे. 28 ऑगस्टला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल.
आशिया कपची (t20 world cup 2022) फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. आधी आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत होणार होती. पण परिस्थिती पाहून आता ही स्पर्धा यूएई मध्ये हलवण्यात आली आहे.
आशिया कपचं शेड्यूल जाहीर
आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्टला श्रीलंक आणि अफगाणिस्तान मध्ये होईल. त्यानंतर रविवारी भारत-पाकिस्तानची टक्कर होईल. या स्पर्धेत बांगलादेशचा संघही सहभागी होणार आहे. एक क्वालिफायर संघही आशिया कप मध्ये खेळताना दिसेल. संघांची दोन ग्रुप्स मध्ये विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुप मध्ये भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर टीम आहे. बी ग्रुप मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ आहे.