ताजी बातमी ऑनलाईन टीम
“म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा”,अशी अवस्था राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे,अश्या बोचऱ्या शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे.तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडून उदय सामंत यांच्या गाडीवरचा हल्ला करण्यात आला आहे,असा आरोपही आमदार पडळकरांनी केला आहे,ते आटपाडी मध्ये बोलत होते.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेला “निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत,ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत,तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत,त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना ही फक्त मदत सुरू आहे असेही ते म्हणाले