Saturday, July 27, 2024
Homenewsप्रेम प्रकरणातून बहिणीच्या नवऱ्याचा अपहरण करून खून....

प्रेम प्रकरणातून बहिणीच्या नवऱ्याचा अपहरण करून खून….

फलटण तालुक्यातील जिंती येथील शकील अकबर शेख (वय-21) यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. हा प्रकार प्रेमप्रकरणातून करण्यात आला असून आंतरधर्मिय लग्न केल्यानेच ऑनर किलिंग झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित मेहुणा मोन्या निंभोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती येथील शकील यांचे अपहरण करण्यात आले होते. यामध्ये हे अपहरण आणि खून शकिल यांचा मेहुणा मोन्या निंभोरे यांना केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. शकील शेख याने दीड वर्षांपूर्वी मोन्या निंभोरे याच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते.

दोघांनी आंतरधर्मिय लग्न केल्याचा राग मोन्याच्या मनात होता. लग्नानंतर मोन्याच्या बहिणीने आपले नाव बदलून खुशी असे केले. लग्न झाल्यानंतर शकील व त्याची पत्नी हे जिंती येथील विकासनगर येथे राहत होते. लग्न केल्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये मोन्याने शकील याच्यावर जीवघेणा तलवार हल्ला केला होता.
सोमवार दि.16 रोजी दुपारी शकील व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे हे दोघे दुचाकी क्रमांक (एम. एच.11 एस-4434) वरून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती येथे गेले. ते कपडे घेवून परतत असताना रात्री 9 च्या सुमारास शकीलच्या दुचाकीला गाडी आडवी मारत चार ते पाच जणांनी शकील याचे अपहरण केले. त्यामुळे शकील याची पत्नी खुशी शकील शेख (वय- 22) हिने त्याच्या अपहरणाची तक्रार दिली.


पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ तपासास सुरूवात केली. तेव्हा पोलिसांना शकील याचा मृतदेह होळ, (ता. फलटण) येथे आढळून आला. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोनि नितीन सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दाखल झालेली अपहरणाची तक्रार व वर्णनावरून तो मृतदेह शकील याचा असल्याचे समोर आले. अपहरणाची तक्रार व त्यानंतर खून झाल्यानंतर प्रेम प्रकरणातूनच खुशी हिचा भाऊ मोन्या यानेच खून केल्याची शक्यता धरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -