Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानआधार कार्डबाबत महत्वाचा निर्णय, नागरिकांना करावे लागणार ‘हे’ काम…!

आधार कार्डबाबत महत्वाचा निर्णय, नागरिकांना करावे लागणार ‘हे’ काम…!

आधार कार्ड प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र.. कोणतंही सरकारी काम असो, आता आधार कार्डची मागणी केली जातेच. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) नागरिकांना हे आधार कार्ड जारी केलं जातं.. 2010 पासून नागरिकांना आधार कार्ड देण्यास सुरुवात झालीय..

दरम्यानच्या काळात अनेक बदल झाले आहेत. वय, पत्ता, तसेच नागरिकांच्या दिसण्यात बरेच बदल झाले असले, तरी अनेकांनी आपले आधार कार्ड (Aadhar card) अपडेट केलेले नाही. त्यामुळे ‘युआयडीएआय’ने (UIDAI) 10 वर्षांपेक्षा अधिक काळ आधार कार्ड काढलेल्या नागरिकांचे आधार अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक

देशातील 40 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व ठाणे जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. सध्या तरी आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरूपाचे आहे. मात्र, अन्य जिल्ह्यातील नागरिकांनाही आधार अपडेट करता येणार आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘युएआयडीएआय’ने ‘माय आधार’ संकेतस्थळावर ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, नागरिकांना कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही आपली माहिती अद्ययावत करता येईल. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधार कार्डवरील तपशीलात बदल करू शकतात.

दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानंतर संपूर्ण देशभर हा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. त्याद्वारे नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -