Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर ; वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : गेल्याच वर्षी प्रेमविवाह केलेल्या १८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. वैभव नागराज गजाकोश (वय १८ रा. राजेंद्रनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात सोमवारी दुपारी घडली.



पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वैभव गजाकोश याला घोडे शर्यतीचा शौक होता. त्याने गेल्याच वर्षी राजेंद्रनगरातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तो आई-वडीलांच्या घरापासून काही अंतरावर स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन रहात होता. घोडे शर्यतीत त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो गेले पाच दिवस आपल्या आई-वडीलांच्या घरीच रहात होता. सोमवारी सकाळी तो आपल्या घरी जातो म्हणून बाहेर पडला.

दुपारी त्याने आपल्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये छतावरील लाकडी वाशाला ओढणीने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच शेजारील व नातेवाईकांनी त्याचा गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे. याची नोंद राजारामपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -