ताजी बातमी ऑनलाईन टीम
महिला आशिया चषक 2022मधील अंतिम सामना शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले. यासोबतच भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली.
फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान भारतीय महिलांनी 8.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.