महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकीची धुरळा, ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबरला समोर येईल. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर ताबा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.