Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनसमीर वानखेडेने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कसे अडकवले?

समीर वानखेडेने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कसे अडकवले?

2 ऑक्टोबर 2021. या तारखेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईच्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना क्रूझवर रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. NCB ने बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान याच्यासह एकूण 19 जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणामुळे एक अधिकारी चांगलाच चर्चेत आला होता. नाव होते समीर वानखेडे.

मात्र, त्यानंतर समीर वानखेडे याने कायद्याच्या नियमांना बगल देत आर्यन खानला आरोपी बनवल्याचा आरोप झाला होता. आता सीबीआयने समीर वानखेडेवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना धाडीच्या बहाण्याने पैसे उकळायचे होते, अशी चर्चा होती. यासाठी त्याने अशा व्यक्तीला मोहरा बनवले, जो त्याला सहज पैसे पाठवू शकेल. तो होता शाहरुखचा मुलगा आर्यन खान.

ड्रग्ज प्रकरणात अडकवून करायची होती करोडोंची वसूली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना 25 कोटींची वसूली करायची होती, असे खुद्द सीबीआयने नमूद केले आहे. कदाचित याच कारणामुळे आर्यन खान त्यांच्या निशाण्यावर आला होता. त्याच्याकडून अॅडव्हान्स म्हणून 50 लाख रुपयांची लाचही घेतल्याचे सीबीआयने सांगितले आहे. आरोपी अधिकाऱ्यांमध्ये समीर वानखेडेचेही नाव आहे. वानखेडे यांच्यावर लाच घेण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप आहे.

आरोप मान्य करण्यासाठी आर्यनवर टाकण्यात आला दबाव
एनसीबीचे अधिकारी आर्यन खानवर आरोप मान्य करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा दावा करण्यात आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनवर आपला रोष दाखवला. पण, आर्यनने आरोप फेटाळले. यादरम्यान शाहरुख खान आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -