Friday, February 7, 2025
Homeराजकीय घडामोडीलोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज!

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज!

मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची मोठी घोषणा करेल, अशा हालचाली आहेत. महागाई भत्ता वाढवण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा होण्याची चर्चा आहे.


सातव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कोणताही नवा आयोग स्थापन करणार नाही, अशी चर्चा होती. दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना त्याचे सूतोवाचही केले होते. मात्र महागाई, बेरोजगारीचा उच्चांक लक्षात घेत सन २०२४च्या एप्रिलपासून होणाऱ्या लोकसभा रणधुमाळीआधी मोदी सरकारला आपला हा निर्धार बदलावा लागू शकतो.


सातव्या वेतन आयोगानंतर पुढचा वेतन आयोग आणण्याची चाचपणी सरकार दरबारी निश्चितपणे सुरू आहे. अद्याप याबाबत अर्थ मंत्रालय वा सरकारकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. मात्र २०२४ हे निवडणुकीचे वर्ष असल्याने लाखो कर्मचाऱ्यांची नाराजी ओढवून घेण्याची सरकारची (Modi Govt) तयारी नाही. त्यामुळेच सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पुढील वेतन आयोगाची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा केंद्रीय कार्यालयांत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -