आज (ता. २६) सकाळपर्यंत या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा अंदाज जलसंपदा विभागाने रात्री उशिरा व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून दिवसभरात शहर आणि ग्रामीण भागातील २९ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली आहेत.
आलमट्टी धरणात (Almatti Dam) ७१.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून आज (ता. २६) सकाळी नऊपासून विसर्ग १५ हजारवरून ३० हजार क्युसेक करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राधानगरी धरणामधून विसर्ग होऊन पंचगंगा नदीची पाणीपातळी आठ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली.