देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने एलपीजीच्या किमती कमी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. या कपातीमुळे गॅसचे दर 9 वर्षांपूर्वीच्या दरावर पोहोचले. यापूर्वी एलपीजी गॅसची किंमत 1100 रुपये होती, मात्र 200 रुपयांची कपात झाल्यानंतर आता गॅस 900 रुपयांत मिळत आहे. या सगळ्यात केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, आणखी 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जातील. पुढील 3 वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना हे एलपीजी कनेक्शन दिले जाईल.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली आहे
पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधन आणि ओणमच्या मुहुर्तावर एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 900 रुपयांमध्येही 200 रुपये कमी द्यावे लागतील. उज्ज्वला योजनेच्या यशाचे कौतुक अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे महिलांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाले आहेत.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
गॅसच्या दरात कपात केल्यानंतर उज्ज्वला योजनेचा सर्वाधिक फायदा लाभार्थ्यांना होणार आहे. याआधी त्यांना गॅसवर 200 रुपये सबसिडी मिळायची पण आता 400 रुपये सबसिडी मिळणार आहे. 75 लाख एलपीजीच्या मोफत कनेक्शनच्या सरकारच्या घोषणेनंतर, देशातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटींवरुन 10.35 कोटी होईल.
महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 75 लाख मोफत LPG कनेक्शन मिळणार!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -