Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगराज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात गावागावांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात होतेय. गावगाड्याचा कारभारी निवडण्यासाठी 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होतेय. निवडणुकीत राज्यातली जनता थेट सरपंचाची निवड करणार आहे. 2 हजार 489 सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे गावागावात चुरशीचं वातावरण तयार झालंय..

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा
राज्यात 5 नोव्हेंबरला एकूण 2359 ग्रामपंचायतीत निवडणूक होतायत. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होणार आहे.
6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडेल.

विभागवार ग्रामपंचात निवडणूक
कोकण (360), उत्तर महाराष्ट्र (457), पश्चिम महाराष्ट्र (656), मराठवाडा (254), तर विदर्भात (632) जागांसाठी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

नागपूर – 365 ग्रामपंचायती
देवेंद्र फडणवीस – भाजप
चंद्रशेखर बावनकुळे – भाजप
सुनील केदार – काँग्रेस
अनिल देशमुख – शरद पवार गट

पुणे – 231 ग्रामपंचायती
अजित पवार – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
हर्षवर्धन पाटील – भाजप
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी (शरद पवार गट)

रायगड – 210 ग्रामपंचायती
भरत गोगावले – शिंदे गट
सुनील तटकरे – राष्ट्रवादी (अजित पवार गट)
अनंत गीते – ठाकरे गट

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -