Saturday, July 27, 2024
Homeसांगलीशेतकऱ्यांची बिले थकल्याने यशवंत शुगरला निर्वाणीचा इशारा

शेतकऱ्यांची बिले थकल्याने यशवंत शुगरला निर्वाणीचा इशारा

खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ३० नोव्हेंबरपर्यंत द्या, अन्यथा उत्पादित साखरेचा लिलाव काढून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा इशारा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी नागेवाडीच्या यशवंत शुगर ला दिला आहे.

नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर साखर कारखान्याने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची १ फेब्रुवारीपासूनची गेल्या गळीत हंगामात घालण्यात आलेल्या ऊसाची बिले आज अखेर दिलेली नाहीत. हा विषय शेतकरी सेनेने चांगलाच लावून धरलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -