शासनाकडून गरजू लोकांनां मोफत रेशन मिळत आहे. कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत रेशन वितरित केले जात आहे. कोरोनाच्या आधी रेशन कार्ड धारकांना रास्त भावात हे रेशन उपलब्ध होत होते. पण, शासनाच्या या योजनेचा काहीजण अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून आता अशा अपात्र लोकांवर कठोर कारवाई केली जात आहे. जे लोक रेशन कार्ड साठी अपात्र असतानाही याचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे
🗣️ *या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार*
शासनाच्या नियमानुसार, – ज्या लोकांकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट/दुकान, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर आहे अशा लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार आहे.
ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे अशा लोकांचे देखील रेशन कार्ड कायमचे बंद होणार आहे.- ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरी भागात कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे.