Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत गोदामास भीषण आग सुमारे ८० लाखाची हानी ; अथक प्रयत्नानंतर आगीवर...

इचलकरंजीत गोदामास भीषण आग सुमारे ८० लाखाची हानी ; अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

येथील आसरानगर बस स्टॉप परिसरातील कापूस गोदामास शनिवारी प्रचंड आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून या भीषण आगीत सुमारे ८० लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. इचलकरंजी महानगरपालिका आणि हातकणंगलेच्या ९

अग्निशमन बंबाद्वारे पाण्याचा मारा करून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, मणीशंकर के सरवाणी (रा. कोल्हापूर रोड शाहू पुतळाजवळ, इचलकरंजी) यांचे सांगली रोडवर आसरानगर बस स्टॉपसमोरच असलेल्या भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे.

 

शनिवारी हे गोदाम बंद होते. पण दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोदामातून धुर निघत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माहिती केसरवाणी यांना दिल्यानंतर त्यांच्यासह नातेवाईक घटनास्थळी धावून आले. गोदामात पाहणी केली असता आग लागल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तातडीने महापालिका हातकणंगलेतील अग्निशमन

आणि

दलास पाचारण केले. उन्हाचा

तडाखा आणि ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला

उन्हाचा तडाखा आणि ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला लागलेल्या आगीने बघता बघता रौद्ररुप धारण केले. कापसाचा मोठा साठा असल्याने आग विझवल्यानंतरही उशिरापर्यंत गाठी धुमसतच

होत्या.

लागलेल्या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. कामगार आणि भागातील नागरिकांच्या मदतीने कापूस गाठी बाहेर काढण्यात येत होत्या. मात्र गोदामात धुराचे लोट निर्माण झाल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे गोदामाचे पत्रे फोडावे लागले. अग्रिशमन दलाचे जवान आणि नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर ९ बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. कापसाचा मोठा साठा असल्याने आग विझवल्यानंतरही उशिरापर्यंत गाठी धुमसतच होत्या. यामध्ये ८० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -