इचलकरंजी : पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त: नव्याने निवडणुका होणार
ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाने बरखास्त केले असून नव्याने निवडणूक घ्यायच्या आदेश आज गुरुवारी देण्यात आले आहेत.
आता ही नवीन निवडणूक कार्यक्रम 29 एप्रिलला सुरू होऊन 11 मे पर्यंत चालणार आहे. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या सौ रजनीताई मगदूम यांना याचा मोठा फायद्याचा दिलासा मिळाला असून पीएम पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. पंचगंगा साखर कारखान्याची ही निवडणूक नुकताच म्हणजेच तीन महिन्यापूर्वी झाली होती.
सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून केंद्रीय सहकार खात्याने हे नवीन आदेश दिले आहेत. दरम्यान ही बातमी इचलकरंजी परिसरात पसरताच राजकीय मंडळींसह शेतकऱ्यांमध्ये कुतूहलनाने या निर्णयाचे चर्चा होत आहे.