स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला.
रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांच्या मृत्यूनंतर नामपूर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांच्या मृत्यूनंतर नामपूर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थी संकलन व रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यावर अस्थी व रक्षा गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
हिंदू परंपरेनुसार, विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे. यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत उभारावी, नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून wकरण्यात येत आहे..