दोन दिवसांपूर्वीच हदगाव तालुक्यातील वरवट येथील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एका महिलेसह दोन मुलींच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच गारगव्हाण गावालगत शेतकèयांच्या मालकीच्या जमिनीवर रेल्वे कामासाठी लागणाèया मुरुमासाठी बेहिशेबी खोदकाम केलेल्या खाणीत दोन युवकांनी जीव गमावला आहे.
शेतकरी कुंडलिक वाढवे यांच्या शेतालगत असलेल्या या खाणीत पोहण्याचा मोहात गावातील विवाहाला बगल देऊन पोहायला गेलेल्या गारगव्हाण येथील दहाव्या वर्गात शिकणारा निखिल कुंडलिक वाढवे (वय 16) विवाहाला नातेवाईक म्हणून आलेला संघर्ष बाळू पडघणे (वय 17, नेवरी ता. हदगाव) या दोघांच्याही पोहण्याचा मोह जिवावर बेतला आहे.
या दोघांचाही या खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 29 मे रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी बिट जमादार कृष्णा यादव आपल्या सहकाèयांसह घटनास्थळ गाठले.
त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दुदैवी घटनेची माहिती कळताच गारगव्हाणसह नेवरी येथे शोककळा पसरली आहे.