गेल्या आठ दिवसापासून पाणी येत नसलेल्या कारणावरून नेहरूनगर मधील संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आवळे मैदानच्या मुख्य रस्त्यावर अचानकपणे रास्ता रोको केला. महिलांच्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
विविध तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसापासून शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आठवड्यातून एक वेळा पाणी येत असल्यामुळे
नागरिकांमध्ये महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये नेहरूनगर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्यामुळे भागातील नागरिक विशेषतः महिलावर्ग त्रस्त झाला होता. त्यामध्ये गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आवळे मैदान रोडवर महिलांनी अचानक रास्ता रोको केला. सदर आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाले होते.
आंदोलन स्थळी गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले होते. आंदोलनाची माहिती समजतात पाणीपुरवठा विभागाचे बाजीराव कांबळे यांनी भेट देऊन भागात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी भागातील माजी नगरसेवक अब्राहम आवळे घटनास्थळी आले होते.