Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात पावसाचा कहर! नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेकांच्या घरात...

मराठवाड्यात पावसाचा कहर! नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेकांच्या घरात शिरलं पाणी

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

 

छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेडा बनगाव ,कुबेर गेवराई. लाहुकी यासह अन्य भागात नदी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसाला लोकांची धांदल उडाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदी ओढे ओसंडून वाहत आहेत.

 

शेती पिकांचं मोठं नुकसान

छत्रपती संभजीनगर तालुक्यातील दूपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पावसामुळे कूबेर गेवराई, बनगाव, जयपुर, वरझडी, परीसरात लाहूकी नदीला मोठा पूर आला आहे. या पूराचे पाणी कूबेर गेवराई, बनगाव येथील अनेक घरात शिरल्याने नूकसान झाले आहे. या झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेती खरडून गेल्यानं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळं नदीकाठच्यागावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लातूर जिल्ह्यात रात्रीपासून कोसळत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प 73 टक्के भरला असून माकणी येथील निम्न तेरणा धरण 85 टक्के क्षमतेपर्यंत भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पांतून पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे.

 

शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली, वाहतूक ठप्प

दरम्यान, लातूर जिल्हा सीमा भागातील औराद शहाजानी परिसरात काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमस्थळी पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. औराद शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, नदी–नाले व पुलांपासून दूर राहणे, मुलांना पाण्याजवळ न पाठवणे आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -