Tuesday, June 2, 2026
Homeमहाराष्ट्रहॉटेलमध्ये खाताय ते ‘पनीर’च आहे का? रेस्टॉरंट, हॉटेल चालकांकडून आरोग्याशी खेळ, अन्न...

हॉटेलमध्ये खाताय ते ‘पनीर’च आहे का? रेस्टॉरंट, हॉटेल चालकांकडून आरोग्याशी खेळ, अन्न व औषध प्रशासनाचा मोठा दणका

खाद्यपदार्थात सर्वात मोठी भेसळ होते. कित्येक दिवसांच्या तेलात पदार्थ तळले जातात. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जी थाळी, डिश तुम्ही मागवली, ती भेसळयुक्त पदार्थांची नाही, याची खात्री कुणालाच देता येत नाही. केवळ जिभेला चव येते हाच एक निकष ग्राहकांचा असतो, त्यामुळे हॉटेल्स चालकांचे फावते. आता पनीर डिश ऑर्डर करत असाल तर ते खरंच पनीर आहे का याची खात्री करून घ्या. कारण पनीरच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी चीज ॲनालॉग मारले जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात आता अन्न व औषध प्रशासनाने मोठा इशारा दिला आहे.

 

चीज ॲनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचा इशारा दिला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पनीर फक्त दुधापासून तर अॅनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होते. रेस्टॉरंट, हॉटेल्सला बिल मेनूकार्डवर “चीज/पनीर ॲनालॉग” स्पष्ट नमूद करणे बंधनकारक असल्याचे औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

लेबलिंग व माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. उत्पादक आणि पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणे आवश्यक असल्याचे बजावण्यात आले आहे. तर ग्राहकांना खरेदीवेळी “ॲनालॉग” तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

सरकारचे याविषयीचे परिपत्रक : Cheese

 

चीज/पनीर ॲनालॉग असे वेगवेगळे स्पष्ट करा

 

चीज ॲनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचा इशारा दिला आहे. रेस्टॉरंट/हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात मुद्दा मांडला होता. मंत्री नरहरी झिरवळांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने थेट आदेश दिले आहे.

 

पनीर फक्त दुधापासून तयार होते. तर चीज ॲनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होतो. रेस्टॉरंट/हॉटेल्सला बिल, मेनूकार्डवर “चीज/पनीर ॲनालॉग” स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. लेबलिंग व माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आले आहे. उत्पादक/पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणे आवश्यक आहे. संशयास्पद प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन देण्यात आले आहे. राज्य सरकारने आता याविषयी गंभीर दखल घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -