महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा रिझल्ट आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी, 84 टक्के लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून 93.15 टक्के मुली तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. निकालाचं सविस्तर वाचन करतानाच बोर्डाने निकालाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी मार्कशीटमध्ये काही बदलही केल्याचं नमूद केलं.
तसंच कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगत बोर्डातर्फे काही बदल होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. 12 वीची परीक्षा कागदावर घेण्यासंदर्भात बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
निकालाचे सविस्तर वाचन करताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी कागदाच्या वापरबद्दलही माहिती दिली. परीक्षेसाठी जवळपास दोन हजार मॅट्रिक टन कागद वापरला. दोन हजार टन कागद वापरला जातो. मी जाणीवपूर्व किती कागद खर्च करतो हे सांगितलं. कागद हा झाडांपासून येतो. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे आपण रोज ऐकतोय. त्यामुळे आता 12 वीची परीक्षा डीजिटल घेता येईल का हे पाहावं लागणार आहे, असं अधिकाऱ्यांन नमूद केलं. 20-20 टनाचे 100 ट्रक एवढा कागद आपल्याला परीक्षेसाठी दरवर्षी लागतो. हा पर्यावरणाचा मोठा ऱ्हास आहे. त्यामुळे आता 12 वीची परीक्षा कागदावर न्वहे तर डिजीटली होण्याची शक्यता आहे. हाँ मोठा बदल लवकरत होऊ शकतो.
यावेळी बारामतीच्या कस्टडीवरून केंद्रावर पेपर वाहण्यासाठी जीपीएस ट्रंक वापरली होती. कुणीही प्रश्नपत्रिकेत छेडछाड होऊ नये म्हणून डीजिटल प्रणाली वापरली. हा प्रयोग सेफ झाला, असही त्यांनी नमूद केलं.
आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी
यापूर्वी निकालानंतर मार्कशीट दहा दिवसात मिळायची तर सर्टिफिकेट 6 महिन्याने मिळायचं. मात्र आता पहिल्यांदाच मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळेल. म्हणजे निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. मार्कशीटवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि क्यूआरकोड असणार आहे. या सर्वांसाठी ३ कोटींची बचत केली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आधी मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर पूर्वी आधी आडनाव यायचं. आता अपार किंवा आधारवर जसं नाव असतं. तसंच पहिलं विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव देणार आहोत.




