कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे तारदाळ, खोतवाडी गावात पाणीच पाणी झालेल आहे. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. काही तास वीजपुरवठा खंडित केला गेला. कालपासून धो धो सुरू असलेल्या या पावसामुळे अनेकांची कामे थांबली आहेत. ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे व रस्त्यावरही पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तारदाळ मध्ये शेतामध्ये पाणी भरपूर प्रमाणात साचले आहे. कालपासून सुरू असलेल्या या पावसामुळे तारदाळ, खोतवाडी लोकांना त्रास सहन करायला लागत आहे. शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.






