Homeसांगलीमिरजेत सातवीच्या बाप्पांना निरोप: गणेश तलाव येथे रात्री २ पर्यंत गणेश...

मिरजेत सातवीच्या बाप्पांना निरोप: गणेश तलाव येथे रात्री २ पर्यंत गणेश मूर्ती विसर्जन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गणपती बाप्पाचे आगमन होऊन काल सात दिवस पुर्ण झाले.मिरजेत सातवीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.मिरज हे एक गणेश नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे.यामध्ये पाचवी,सातवी,नववी आणि शेवट अनंत चतुर्दशी दिवशी सर्व गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो.काल सातवीच्या बाप्पाना मिरजेतील मंडळांनी तसेच घरगुती गणेश बाप्पाना आनंद आणि एकदम भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.गणेश तलाव येथे सातवीच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी महापालिका आणि अग्निशमन दलाची टीम सज्ज होती.तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच गणेश भक्त आणि विविध मंडळ आणि घरगुती गणपती बाप्पाना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते.काल सातवीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -