Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरमित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

सहकारी मित्राकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून आकाश शांताराम बोराडे (वय 23, सध्या रा. आर.के.नगर, कोल्हापूर, मूळ कतराबाद, परांदा, जि. धाराशिव) याने गळफास घेऊन जीवन संपवले.

 

पोलिसांनी खोलीतून चार पानी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पालकांच्या जबाबानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शुक्रवारी सांगण्यात आले.

 

करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आकाश बोराडे के.आय.टी.मध्ये एमबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. अंतिम परीक्षाही नुकतीच दिली आहे. एका मॉलमध्ये त्याची डिपार्टमेंट व्यवस्थापक म्हणून निवडही झाली होती. मात्र, काही दिवसांपासून तो ताणतणावाखाली वावरत होता. त्याच्या एका मित्राकडून होणार्‍या त्रासाला तो कंटाळला होता. नात्यातील काही मंडळींच्याही निदर्शनास त्याने हा प्रकार आणून दिला होता. मात्र, कालांतराने त्रास वाढतच राहिल्याने गुरुवारी रात्री उशिरा त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

 

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली चार पानी सुसाईड नोट पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ताब्यात घेतली आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाचा ताबा घेऊन नातेवाईक धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. उद्या, शनिवारी सायंकाळपर्यंत नातेवाईक कोल्हापूरला परततील. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. केवळ मित्राकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवनाचा शेवट करून घेतल्याने आर.के.नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -