Wednesday, February 25, 2026
Homeक्रीडारिंकु सिंह टीम इंडियाची साथ सोडून घरी परतला, अचानक काय घडले? जाणून...

रिंकु सिंह टीम इंडियाची साथ सोडून घरी परतला, अचानक काय घडले? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरू आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला आणि दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताने हा सामना 76 धावांनी गमवल्याने नेट रनरेट हा -3.850 इतका घसरला आहे. त्यामुळे हा नेट रनरेट सुधारण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. असं असताना गुरूवारी झिम्बाब्वे विरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणं भाग आहे. त्यात नेट रनरेट सुधारण्याची जबाबदारीही असणार आहे. भारताने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज आणि फिनिशर म्हणून ख्याती असलेला रिंकु सिंहला अचानक अलिगडला घरी जावं लागलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. टीम इंडियात सर्व काही व्यवस्थित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकु सिंहला वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी परतावं लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -