महाराष्ट्रात आजपासून बहुप्रतिक्षित ‘जनगणना 2027’ प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे, ही भारताची पहिली ‘डिजिटल जनगणना’ असून स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे.
मुख्य प्रधान जनगणना अधिकारी (महाराष्ट्र) निरुपमा डांगे यांनी जनतेला या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जनगणनेचे दोन टप्पे
जनगणना प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत राबवली जाणार आहे.
पहिला टप्पा (1 मे – 14 जून 2026): या टप्प्यात घरांची यादी आणि घराच्या स्थितीबाबतची माहिती घेतली जाईल.
दुसरा टप्पा (फेब्रुवारी 2027): या काळात लोकसंख्या गणना आणि लोकसंख्येच्या रचनेवर लक्ष केंद्रित केले जाईल.



