ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघामध्ये ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सामना सुरू आहे. मुंबई इंडीयन्सची धावसंख्या १४ षटकांनंतर ११७ इतकी आहे.
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली आहे. रोहीत शर्मा ३२ चेंडूमध्ये ४१ धावांवर बाद झाला. तर अनमोलप्रितसिंग ९ चेंडूमध्ये ८ धावा करत माघारी परतला आहे. आयपीएलमध्ये सलग नऊ वेळेस अर्धशतकी खेळी करण्यास रोहीत शर्मा अपय़शी ठरला आहे.
पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि ईशान किशनने ५० धावांची भागिदारी केली . मुंबई इंडीयन्सची धावसंख्या १२ षटकांनंतर ९१ इतकी आहे. रोहितने २२ चेंडूमध्ये २९ धावांची खेळी केली आहे तर ईशान किशनने २२ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या आहेत. ईशान किशन आणि टिळक वर्मा क्रिजवर टिकून आहेत. (IPL)