राज्याात काेणाचीही हुकूमशाही चालणार नाही. येथे कायद्याअचे राज्यण आहे. तुमचा अल्टिमेटम तुमच्या घरातल्यांना द्या, आम्हाला नको. महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये. सरकार अल्टिमेटमवर नाही चालत, ते कायद्यानेच चालते, अशा शब्दाषत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टाेला लगावला. भोंग्यांविषयी जो काही निर्णय देण्यात येईल तो सर्व धर्मांना लागू होईल, असेही त्यां नी मुंबई येथे आयाेजित पत्रकार परिषदेत स्परष्ट केले.
या वेळी अजित पवार म्हबणाले, ” राज्याेतील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सगळ्यांना नियम सारखे आहेत. भोंग्यांसाठी अधिकृत परवानगी घ्यावी. हे आव्हान करूनदेखील कोणी परवानगी घेतली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’.
नागरिकांनी कोणत्याही भावनिक आवहनाला बळी पडू नये. कायदा हातात घेण्याचं धाडस कोणीही करू नये. न्या यालयाने सांगितलेली आवाजाची मर्यादा पाळा, असे आवाहनही त्यां्नी केले.