ताजी बातमी ऑनलाईन टीम
विठूरायाच्या (Vithuraya) भेटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीची (Ashadhi Wari) आज घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी (Tukaram Maharaj Palakhi) 20 जूनला पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान करणार आहे. देहू संस्थांनाने या सोहळ्याची आज घोषणा केली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Dnyaneswar Maharj Palakhi) आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे पायी वारीत खंड पडला. विठू माऊलीचे दर्शन मिळत नसल्यामुळे वारकरी नाराज झाले होते. पण यावर्षी वारकऱ्यांना पायी वारीमध्ये सहभागी होता येत विठूरायाचे दर्शन घेता येणार आहे. आज आषाढी वारीची (Ashadhi Wari 2022) घोषणा करण्यात आल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा देहू संस्थांनने केली. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा तुकाराम महाराजांची पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास करत तुकाराम महाराजांची पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल.