Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूरच्या २ मल्लांमध्ये 'कुस्ती' अटळ; राज्यसभा बिनविरोधचा 'मविआ'चा प्रस्ताव भाजपने फेटाळला

कोल्हापूरच्या २ मल्लांमध्ये ‘कुस्ती’ अटळ; राज्यसभा बिनविरोधचा ‘मविआ’चा प्रस्ताव भाजपने फेटाळला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ऐनवेळी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आता या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून खरी कुस्ती शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकरांमध्ये रंगणार आहे.


महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत एक जादा जागा सोडण्याचा दिलेला फायद्याचा प्रस्तावही भाजपने नाकारल्याने महाविकास आघाडीनेही आता सावध पवित्रा घेतला आहे. दगाफटका होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या तंबूची चाचपणी करण्यासाठी 6 जूनला अपक्ष व पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

विधानसभा आमदारांमधून निवडून जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेनेने दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी तीन वाजेपर्यंत अंतिम वेळ होती. त्यापूर्वी सकाळी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले.

पण ते निष्फळ ठरल्याने सातही अर्ज कायम राहिले. त्यामुळे आता 10 तारखेला निवडणूक होणार असून घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. भाजपने आपला तिसरा अर्ज पान 6 वर मागे घ्यावा म्हणून महाविकास आघाडीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार आणि शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर निवडणूक बिनविरोध करण्यावर वाटाघाटी करण्यात आल्या. पण या वाटाघाटी निष्फळ ठरल्या. दोन्हीकडून परस्परांना उमेदवारी मागे घेण्याचा प्रस्ताव दिल्याने चर्चा फिसकटली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -