Saturday, July 27, 2024
Homenewsतिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत.. तरुणीसह ६...

तिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत.. तरुणीसह ६ जणांना ठोकल्या बेड्या

तिचे शिक्षण केवळ नववी पास..सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत..पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात, पतीच्या मित्रासोबत ओळख झाली. तो देखील गुन्हेगार..त्यातूनच त्यांनी ‘हनीट्रॅप’ टोळी च्या माध्यमातून व्यवसायिक, तरुणांना जाळ्यात खेचण्यात सुरूवात केली.

अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरून तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले. मात्र चार दिवसापूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले.  अन्

अवघ्या ७२ तासांच्या आत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप टोळी गजाआड केली.

रविंद्र भगवान बदर (वय 26,रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40,रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा),मंथन शिवाजी पवार (वय 24,रा. इंदापूर) आणि (19 वर्षीय) तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टोळीतील (19 वर्षीय) तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्यवसायिक नितीन पवार यांच्यासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले. रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलाविले होते.

त्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यवसायिक चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते.

दरम्यान अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अड़वून गाडीत बसून त्यांना मारहाण केली. तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली.

पैसे दिले नाही तर संबंधीत महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल असे कागदावर लेखी घेतले. त्यावर व्यवसायिकाची सही व हाताचा अंगठा देखील घेतला. त्यानंतर व्यवसायिकाकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली.

यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील ५० हजारांची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलिसांनी माग काठून आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -