राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच जाताना दिसत आहे. आज संपूर्ण राज्यात 2956 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंत कोरोनाचे 77,49,276 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
तर राज्यात आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा मृत्यूदर हा 1.86 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकीकडे आजचा राज्यातील कोरोना आकडा हा दुप्पट असून राज्यात बीए5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण ठाणे शहरात आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.