ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूरमध्ये (दि.१, ऑगस्ट) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा हा कार्यक्रम पार पडला. मिरजकर तिकटी येथे झालेल्या सभेत त्यांनी बंडखोरी केलेले आमदार आणि विरोधक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा या संवाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ते म्हणाले की, गद्दारांची सत्तेची चटक खूप वाईट होती. उठाव केला म्हणतात, पण उठाव केला तर ज्या गोष्टींविषयी सातत्यानं सांगत आहात ते कधी तरी समोर येऊन बोललात का? जर तुम्हाला वाटत असेल की, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणे ही चूक होती, तर या तुम्हाला सढळ हाताने माफ करेन.