Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्याचा पारा 40 अंशावर; कागल तालुक्यात एकाच गावातील उष्माघाताने तिघांचा मृत्यू?...

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 40 अंशावर; कागल तालुक्यात एकाच गावातील उष्माघाताने तिघांचा मृत्यू? आरोग्य विभागाने केला खुलासा

जिल्ह्याच्या सरासरी तापमानात तब्बल तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. रात्रभरही वातावरणात उष्णता जाणवत होती.शहरासह जिल्ह्यात वैशाख वणवा पेटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या घरात गेला असून दिवसभर उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण होऊन गेले आहेत. जिल्ह्याच्या सरासरी तापमानात तब्बल तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. रात्रभरही वातावरणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे नागरिक हैराण होऊन गेले आहेत. हवेत प्रचंड उकाडा वाढल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पाऊस झाला नाही. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यानंतर पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढत चालल्याने शहरातील वर्दळीवर परिणाम झाला असून ते दुपारी रस्ते ओस पडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -