Tuesday, April 7, 2026
Homeइचलकरंजीपंचगंगेनं ओलांडलीये इशारा पातळी, घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नका

पंचगंगेनं ओलांडलीये इशारा पातळी, घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नका

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी,कुंभी,तुळशी,कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीत येत असते. दरम्यान, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र हे पाणी कोल्हापूर शहरापर्यंत यायला 15 तास लागतात. त्यामुळे पाऊस पडला नाही तर नदीची पाणी पातळी जास्तीत जास्त 44 फुटांपर्यंत जाऊ शकते. कोल्हापूर शहरामध्ये पाणी येते त्या ठिकणावरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चिखली, आंबेवाडी, आरे गावातील नागरिकांसाठी सर्व व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची व्यवस्था केलीये. जनावरांचा चारा, त्यांना बांधण्याची व्यवस्था केलीये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सूचनांचे पालन करावे. घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -