Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगगृहिणींचे बजेट कोलमडणार  सर्व प्रकारच्या डाळींच्या किंमती वाढणार!

गृहिणींचे बजेट कोलमडणार  सर्व प्रकारच्या डाळींच्या किंमती वाढणार!

किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चालली आहे. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचे समोर आले आहे.
यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे. तर गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच 6 ‘देशांतर्गत तूरडाळीची तूट लक्षात घेत परदेशातून तूरडाळ आयात करण्याचे धोरण सरकार अवलंबत आहे. यामुळे देशांतर्गत वाढलेल्या तुरडाळीच्या भावावर नियंत्रण मिळविण्यात होईल.

मात्र देशातील डाळीचे भाव पडले तर त्याचा फटका येथील तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांनाच बसणार आहे. यामुळे पुढील वर्षी आणखी क्षेत्र घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील शेतकरी वाचला पाहिजे त्याला भाव मिळाला पाहिजे आणि उत्पादनही वाढले पाहिजे असेच धोरण सरकारने स्विकारले पाहिजे अशी मागणी होत आहे.

त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचेही सांगितले जात आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून सर्व प्रकारच्या किराणा मालाचे भाव तेजीत आहेत. त्यात सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू, ज्वारी, पोहे, शेंगदाणे याचे भाव दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत वाढले आहेत. जसा नवीन माल बाजारात दाखल होईल तसे भाव पडतील अशी आशा आहे. मात्र यावर्षी सर्व प्रकारच्या डाळी त्यातल्या त्यात तूरडाळीचे भाव तेजीतच असतील अशी परस्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या देशातील पेरणीच्या आकडेवारीत डाळीच्या लागवडीचे क्षेत्र घटले असल्याची माहिती आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीचे क्षेत्र नऊ टक्के घटले आहे. याचा थेट परिणाम देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या चार लाख टनाची घट असणार आहे. गेल्यावर्षी देशात आवश्यक असणाऱ्या डाळीतील तूट ही पाच लाख टन होती. यावर्षी ही तूट भरून निघाली नाही, याचा थेट परिणाम भाववाढीवर होणार आहे.

देशात डाळीची तूट निर्माण होण्यामागे बदललेले पाऊसमान हे मुख्य कारण आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागातील राष्ट्रीय खाद्य विषयांच्या माहितीनुसार पाच ऑगस्टपर्यंत देशात १०६.८८ लाख हेक्टरवर सर्व डाळींची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा कमी आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११७.८७ लाख हेक्टर इतका होता. यानुसार पेरणी मध्ये ९.३२ टक्क्यांची घट झाली आहे.

दरवर्षी देशात ४२ ते ४४ लाख टन म्हणजे सर्वाधिक मागणी ही तूरडाळीची असते. मात्र मागील वर्षी पाच लाख टन मालाची घट होती आणि यावर्षी चार लाख टन मालाची घट अपेक्षित आहे. तूर डाळीच्या पेरणी क्षेत्रामध्ये ७.८८ टक्के घट झाली आहे. महाराष्ट्रात चांगल्या पावसामुळे ४४ हजार हेक्टरवर अतिरिक्त पेरणी झाली आहे. मात्र ही वाढ अत्यल्प आहे. डाळीवर प्रक्रिया झाल्यानंतर हाती पडणारी उत्तम डाळ ही कमी उत्पादित होत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -