कोल्हापूर कागल येथील औदूत हरिभाऊ जोशी (३९) यांचा शिरोडा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अवधूत जोशी हे त्याचे मित्र व कुटुंबीयांसह कोल्हापुरातून शिरोडा खागर येथे समुद्रकिनारी(ocean) पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने जोशी यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
यावेळी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत जोशी हे पूर्ण दिसेनासे झाले होते. यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. मित्रपरिवाराने स्थानिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला.
याबाबत सिद्धार्थ मधुकर लोखंडे यांनी वेंगुर्ला पोलिसांत खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस गजेंद्र भिसे करत आहेत.