Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रइंदिरा गांधी विधवा पेंशन योजना

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र: राज्यातील विधवा महिलांना दरमहिना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.

 

राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरवात करत असते त्या योजनांमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एक महत्वाची योजना आहे.घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट येते व पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासते त्यामुळे राज्यातील विधवा महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने देशात या योजनेची सुरुवात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

 

 

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रतीमहा 200/- रुपये व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमहा 400/- रुपये असे एकूण प्रतीमहा 600/- रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. [इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र]

 

वाचकांना विनंती

 

आम्ही Indira Gandhi Vidhwa Pension Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील जे कोणी विधवा महिला असतील त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र चा उद्देश

राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार आणणे.

राज्यातील विधवा महिलांचे जीवनमान सुधारणे.

विधवा महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये. [इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र]

विधवा अनुदान योजना ची वैशिष्ट्ये

विधवा महिलांसाठी योजना महाराष्ट्र केंद्र शासनाद्वारे राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.

योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून महिलांना अर्ज करताना त्रास सहन करावा लागू नये.

योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे योजनेमध्ये पारदर्शकता राहील.

योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन तसेच ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे विधवा महिला आपल्या मोबाईल च्या सहाय्याने घरी बसून अर्ज करू शकतात त्यामुळे त्यांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही व त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल. [इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र]

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र मराठी चे लाभार्थी

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत.

Vidhwa Pension Yojana Maharashtra Marathi चे लाभ

या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा 600/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही तसेच पैशांअभावी त्यांची हेळसांड होणार नाही.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार येईल.

विधवा महिलांचे जीवनमान सुधारेल.

विधवा महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा महिलांना दैनंदिन जीवनात आवश्यक पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. [इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र]

Vidhava Mahila Yojana Maharashtra अंतर्गत निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी

3 महिने

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र अंतर्गत निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी

 

ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आत तलाठी (चौकशी अधिकारी) लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करुन, कागदपत्राची छाननी करुन सविस्तर अहवाल सादर करतात व मिटींगमध्ये मंजुरीस पाठविले जातात. मिटींगमध्ये प्रकरणे मंजुर/नामंजूर झाल्यावर मंजुर/नामंजूर अर्जाची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे कळविली जाते. त्यानंतर लाभार्थाची ओळख पटवून घेऊन, रजिस्टरमध्ये नोंद घेऊन, सर्व पात्र लाभार्थ्यांचे बिल दरमहा कोषागारात सादर केले जाते. त्यावरुन योजनानिहाय बॅक याद्या तयार करुन, लाभार्थ्यांना बॅक खात्यावर पैसे वितरीत केले जातात.विधवा पेंशन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

अर्जदार विधवा महिला महाराष्ट्र/भारताची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Iindira Gandhi Rashtriya Vidhwa Pension Yojana Maharashtra च्या अटी व शर्ती

फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

केवळ 40 ते 65 वर्षाखालील महिलांना या योजनेअंतर्गत सहभागी केले जाईल.

65 वर्षावरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेचा लाभ दिला जाणार नाही. [इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र]

विधवा पेंशन योजना कागदपत्रे

विहीत नमुन्यातील अर्ज

आधार कार्ड

रेशन कार्ड

पतीचा मृत्यु दाखला – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील मृत्युचा दाखला.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित प्रमाणपत्र – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील दाखला.

पासपोर्ट आकाराचे फोटो

मोबाईल नंबर

जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

बँक खात्याचा तपशील

वयाचा पुरावा

पत्त्याचा पुरावा

बीपीएल कार्ड

शपथपत्र

Vidhwa Pension Yojana Maharashtra In Marathi अंतर्गत अर्ज कोठे करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -