वस्त्रोद्योग हा शेतीनंतर अधिक रोजगार निर्मिती करणारा विभाग आहे. तेव्हा यत्रोद्योगाला अधिकाधिक बळकटी देण्यासाठी सौरउर्जेचा पर्याय आला आहे. त्यातील तांत्रीक अडचणी दूर करून वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जा धोरण आणले जाईल अशी ग्वाही यत्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे महाराष्ट्रातील मोठे हव आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या विकासाला शासन नक्कीच साथ देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सावकारे हे गुरुवारी इचलकरंजी दौन्यावर आले होते. या दौन्यात त्यांनी वस्त्रोद्योग, स्पिनिंग मिल्स, प्रोसेस, यंत्रमाग सोसायटीमधील समस्या जाणून घेण्यासाठी विविध संस्थांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कारभार हातात. घेतल्यानंतर इचलकरंजी वस्त्रोद्योगातील विविध घटकांची भेटून समस्या जाणून घेतल्या. कांही प्रश्न सोडवितांना शासकीय धोरणांत बदल करावा लागणार आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार बदल केला जाईल. यातून वस्त्रोद्योगातील संबंधित घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.सध्या राज्यातील साध्या यंत्रमागांची अवस्था बिकट होत चालली आहे. मात्र शासनाकडून या घटकाकडे अपेक्षीत दिले जात नाही, याकडे लक्ष वेधले असता मंत्री सावकारे यांनी साध्या यंत्रमागधारकांकडेही शासन लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. साध्या यंत्रमागाचे अपग्रेडेशन करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच पेन्शन योजना आणणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.